मुख्य सामग्रीवर वगळा

‘स्मार्ट मीटर’बाबत शासनाकडून न्यायालयात महत्वाची माहिती, ‘आता प्रीपेड…’

 ‘स्मार्ट मीटर’बाबत शासनाकडून न्यायालयात महत्वाची माहिती, ‘आता प्रीपेड…’


महाराष्ट्रात विजवितरण अधिक कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी सरकारने विजेचे स्मार्ट मीटर बसविण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.


नागपूर : महाराष्ट्रात विजवितरण अधिक कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी सरकारने विजेचे स्मार्ट मीटर बसविण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या दाव्यानुसार, पारंपरिक मीटरच्या तुलनेत स्मार्ट मीटर ही अत्याधुनिक डिजिटल साधने असून त्याद्वारे ग्राहकांचा वीजवापर रिअल-टाइममध्ये नोंदविला जातो.


त्यामुळे वीजबिल अचूक तयार होण्याबरोबरच ग्राहकाला मोबाईल ॲप, एसएमएस किंवा ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून आपला वापर कधीही तपासण्याची सुविधा मिळते. या योजनेमुळे मीटर रीडिंगसाठी कर्मचाऱ्यांवर अवलंबित्व कमी होणार असून मानवी चुका व भ्रष्टाचाराची शक्यता घटणार आहे.


वीजचोरीवर नियंत्रण ठेवणे, अनधिकृत वापर ओळखणे आणि तांत्रिक बिघाड तत्काळ शोधणे स्मार्ट मीटरमुळे शक्य होईल. वितरण कंपन्यांसाठी हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार असून वीजबिल थकबाकी व तांत्रिक तोटा कमी करण्यास मदत होईल. मात्र, या प्रकल्पाविरोधात न्यायालयातही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


विदर्भ वीज ग्राहक संघटनेने नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेत असे म्हटले आहे की, स्मार्ट मीटर ग्राहकांच्या संमतीशिवाय बसविले जात आहेत, तसेच या मीटरसाठी आवश्यक तांत्रिक व आर्थिक अभ्यास न करता सरकारने जबरदस्तीने अंमलबजावणी केली आहे. 


या संदर्भात उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. राज्य सरकारने याप्रकरणात उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करत स्मार्ट मीटर बसविण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.


प्रीपेड मीटर राहणार?

राज्यात २ कोटी २४ लाख ८८ हजार ८६६ गैरकृषी वीज ग्राहक आहेत. त्यांच्या मीटरला स्मार्ट मीटरमध्ये बदलवले जाणार आहे. आतापर्यंत ३५ लाख ९२ हजार स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.


आताचे डिजिटल मीटर सुस्थितीत असताना वीज वितरण कंपनी अकारण स्मार्ट मीटर लावण्याचा अट्टहास करत आहे. प्रीपेड स्मार्ट मीटरचा रिचार्ज संपला की ताबडतोड वीजपुरवठा बंद केला जाईल. ही व्यवस्था वीज ग्राहकाच्या हिताची नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. 


यावर राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने न्यायालयात शपथपत्र दाखल केले व याचिकाकर्त्याचे आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचा युक्तिवाद केला.


सद्यस्थितीत राज्य शासन केवळ जुने मीटर बदलवून स्मार्ट मीटर लावत आहे. वीज ग्राहकांच्या इच्छेनुसार भविष्यात प्रीपेड मीटरची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते, अशी माहिती राज्य शासनाने शपथपत्रातून दिली. 


राज्य वीज वितरण कंपनी केंद्र शासनाच्या आदेशानुसारच ही योजना राबवत आहे. स्मार्ट मीटरचे दर थोडे अधिक असले तरी याचे अनेक फायदे असल्याचे शासनाने स्पष्ट केले. स्मार्ट मीटरच्या दराचा फटका सामान्य वीज ग्राहकांना बसणार नाही, असेही शासनाने शपथपत्रातून सांगितले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

XEROX MEANING IN MARATHI : कॉलेज–ऑफिसमध्ये रोज ‘झेरॉक्स’शिवाय पान हलत नाही; पण ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या उत्तर...

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या... आपण सर्वांनी कधी ना कधी ऐकलेलं वाक्य, “भय्या, एक झेरॉक्स देना” इतकं सर्वसामान्य झालंय की, त्यामागे खरी कहाणी आहे, हे आपण विसरतो. कॉलेज असो, सरकारी ऑफिस असो किंवा अगदी कोपऱ्यावरचं स्टेशनरीचं दुकान, झेरॉक्स हा शब्द इतका अंगवळणी पडलाय की, ‘फोटो कॉपी’ हा मूळ शब्द कुणाला आठवतच नाही. पण गंमत अशी की, झेरॉक्स हा प्रत्यक्षात अर्थाच्या अनुषंगाने वापरला जाणारा शब्द नाही, तर ते एका अमेरिकन कंपनीचं नाव आहे, ज्यानं जगभरात कॉपी मशीनचं साम्राज्य निर्माण केलं. १९३८ मध्ये चेस्टर कार्लसन नावाच्या संशोधकानं ‘झेरोग्राफी’ नावाची प्रक्रिया शोधली आणि शाई किंवा कार्बन पेपरशिवाय कॉपी काढणं शक्य झालं. याच तंत्रज्ञानावर आधारित ‘XEROX 914’ नावाचं पहिलं प्लेन पेपर कॉपियर मशीन १९५९ मध्ये आलं आणि ते इतकं गाजलं की, कंपनीचं नावच XEROX CORPORATION पडलं. या मशीनच्या अफाट यशामुळे ‘झेरॉक्स’ हा शब्द हळूहळू ‘फोटो कॉपी’साठी पर्याय बनला आणि लोकांच्या जिभेवर तो कायमचा बसला. भारतही त्याला अपवाद ठरला नाही. येथेही “झेरॉक्स काढा,” ...

* डोळ्याखालील काळी वर्तुळे...

स्त्री / पुरुषांच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी घरगुती उपाय पाहुयात... मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही अनेक दिवसांपासून पुरेशी झोप घेत नसाल तर त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात हे टाळण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप (किमान ६ ते ७ तास सलग) घ्या. विश्रांती ही महत्त्वाची आहे, त्यामुळे डोळ्याखालील ताण कमी होऊन ते काळे पडणार नाहीत. 👉सकाळी चहा केल्यानंतर चहाचे (चोथा) छोटे कण फ्रीजमध्ये ठेवा, त्यानंतर थंड झाल्यावर पुरुषांनी डोळ्याखाली हलक्या हाताने चोळा त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. 👉टोमॅटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात, एक चमचा टोमॅटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (१०थेंब) एकत्र करून मिश्रण तयार करावे, हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे, दोन मिनिटे तसेच ठेवावे त्यानंतर थंड पाण्याने धुऊन काढावे. 👉बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत डोळ्या जवळील त्वचेला याचा लाभ मिळतो, बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते, रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे हलक्या हाताने मसाज करावा सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा. 👉स्त्री पुरुषांच...

*INTERVAL WALKING म्हणजे काय?

संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी "Interval Walking" आहे खूप फायदेशीर.समजून घ्या योग्य पद्धत... मित्रांनो, इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते. बरेच लोक चालण्याने वजन कमी होत नाही म्हणून वैतागून जातात आणि शेवटी ते चालणे बंद करतात. तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल तर इंटरव्हल चालणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, इंटरव्हल वॉकिंगमध्ये (INTERVAL WALKING) तुम्हाला लवकर-लवकर चालावे लागते, जेणेकरून जास्त चरबी जाळली जाऊ शकते आणि वजन झपाट्याने कमी (WEIGHT LOSS) होते. या चालण्याच्या दरम्यान शरीराला अनेक ब्रेक दिले जातात आणि प्रत्येक ब्रेकसाठी एक वेळ निश्चित केली जाते. इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते. अशा प्रकारे, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर इंटरवल ट्रेनिंग हा (INTERVAL WALKING FOR WEIGHT LOSS...