मित्रांनो, बदलत्या वातावरणात सेंद्रिय गुळाचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. सेंद्रिय गुळाने सर्दी खोकला तर दूर होतोच, सोबतच महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होण्यास मदत होते. सेंद्रिय पद्धतीने बनवलेल्या गुळाच्या नियमित सेवनाने शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. याने पचनक्रियाही सुधारते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
👉पचनक्रिया सुधारते :
गूळ आणि ओवा दोन्हींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्याने पचन तंत्र चांगलं राहतं. याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला पचन तंत्र सुधारायचं असेल तर गूळ आणि ओव्याचं सेवन केलं पाहिजे.
👉मासिक पाळीतील वेदनेपासून आराम :
गूळ आणि ओव्याचं सेवन केल्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत मिळते. तसेच यांचं एकत्र सेवन केल्याने ब्लड फ्लो चांगला राहतो.
👉कंबरदुखी होईल दूर :
ओवा आणि गुळाचं एकत्र सेवन केल्याने कंबर दुखीपासून सुटका मिळवू शकता. हे मिश्रण रोज झोपण्यआधी एक ग्लास कोमट पाण्यात टाकून सेवन करावं. याने कंबरदुखीची समस्या दूर होईल.
👉सर्दी-खोकला होईल दूर :
सर्दी-खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही गूळ आणि ओव्याचं सेवन केलं पाहिजे. याने तुमच्या घशातील खवखव आणि छातीतील आखडलेपणा दूर होईल.
👉अस्थमा होईल कमी :
अस्थमामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. अशात गूळ आणि ओव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. गूळ आणि ओव्याने फुप्फुसातील होणारी सूज कमी करण्यास मदत मिळते. संकलित...
*टीप : माहिती आवडल्यास पुढे पाठवा गरजूंना उपयोग होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा