मित्रांनो,
१) सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस, दोन चिमूट हळद आणि दोन चिमूट दालचिनी पावडर घालून प्यावे.
२) प्रत्येक जेवणामध्ये प्रोटिन्स (चिकन/पनीर/टोफू/सोयाचंक्स/कडधान्ये) आणि फायबरचा (भाज्या) टक्का वाढवा.
३) जेवताना आधी सलाड, मग प्रोटिन्स आणि मग भात/भाकरी/चपाती खा.
४) संध्याकाळ नंतर शक्यतो सूप्स, सलाड आणि डाळ खा.
५) दुधाचा चहा पुर्ण बंद करा.
६) चटकमटक पदार्थांऐवजी भाजलेले शेंगदाणे/फुटाणे/मखाने/चिरमुरे/लाह्या/पॉपकॉर्न्स खा.
७) ज्यूसऐवजी सिजनल अख्खी फळं खा.
८) दिवसभरात किमान 3 लिटर पाणी प्यावे.
९) साखरेला गूळ पर्याय आहे या भ्रमात राहू नका. दोन्हीही तेवढेच घातक आहेत.
*टीप : माहिती आवडल्यास पुढे पाठवा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* पित्त - कारणे व उपाय...
मित्रांनो,
पित्त होण्यापाठीमागे अनेक कारणे आहेत, तसेच पित्ताचे विविध प्रकारही आहेत. आज आपण कारणे आणि त्यावरील उपचार याविषयी माहिती घेऊया...
*चुकिचा आहार हे एक कारण आहे...*
जसे की, तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ, लाल मांस, ह्या प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाल्ले असतील तर हमखास पित्त होऊन छातीत जळजळ होते.
*विविध अनैसर्गिक पेय...*
नैसर्गिक पेयपान न करता चहा, कॉफी, अल्कोहोल, निकोटिन युक्त पदार्थ म्हणजेच दारु, सिगारेट सतत सेवन केल्यास पित्त वाढते.
*उन्हाचा त्रास...*
तुम्ही तीव्र उन्हात काम करत असाल किंवा उन्हातून फिरणे होत असेल व तुमच्या शरीराला ऊन सहन होत नसेल तर शरीरात पित्त वाढू लागते.
*भावनिक / मानसिक ताण...*
जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अति विचार करून भावनिकदृष्ट्या मानसिक ताण तणाव आला असेल तर पित्त दोष उद्भवतो.
* पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय...
*आवळा...*
आवळा जरी चवीला तुरट असला तरी कफ आणि पित्त प्रकोप कमी करणारा आहे. त्यामधील व्हिटॅमिन सी अन्ननलिका, पोट स्वच्छ ठेवते. पित्ताचा त्रास होत असेल तर कच्चा आवळा थोडे मीठ लावून खाऊ शकता. आवळ्याचे चूर्ण करून ते कोमट पाण्यातून घेऊ शकता. हा उपाय काही दिवस सकाळी केल्यास पित्त विकार कमी होतो. तसेच मोरावळा सुद्धा तुम्ही उपयोगात आणू शकता.
*मूग आणि तांदूळ...*
तुम्हाला पित्त झाल्यामुळे भूक लागत नसेल किंवा जळजळ होत असल्याने काय खावं कोणता आहार घ्यावा हे समजत नसेल अशा वेळी मुगाचं साधं वरण आणि भात त्यावर साजूक तूप घालून काही दिवस खावा. मूग पित्तशामक आहे. तसेच साधा मूग आणि तांदळाचा नीर डोसा देखील खाऊ शकता. तिखट, मात्र या दरम्यान मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
*आलं आणि लिंबू...*
तुम्हाला वाटले असेल की, आलं उष्ण तिखट आहे. पण पूर्वीपासून आल्याचा पित्तशामक म्हणून वापर केला जात आहे. आल्यातील तिखट पाचक रसाने वाढलेले आम्लपित्त कमी होते. तसेच लिंबाचा रस त्यातील व्हिटॅमिन सी मुळे पित्तशय स्वस्थ होते.
जेवणात आलं घ्यावं. तसेच आल्याचा तुकडा किसून मीठ, लिंबाचा रस, किंचित साखर घालून हे सरबत चमचाने थोडथोड पित राहावं.
*कोकम सरबत...*
वर्षभर आमसूल किंवा कोकम घरात सहज उपलब्ध असते. त्यामधे देखील भरपूर व्हिटॅमिन सी असते. कोकम सरबत किंवा आमसूल सेवन करून पित्त शमन होते.
*थंड दुध...*
थंड दुध वाढलेली जळजळ कमी करते. थोडेसे थंड दूध किंचित खडीसाखर घालून प्यायल्यास पित्त कमी होते. छाती आणि पोटातील जळजळ थांबते.
*पिकलेली केळी...*
केळ्यातून शरीराला खूप जास्त पोटॅशियम मिळतं. त्यामुळे केळ खाल्ल्यास पोटातील आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच शरीराल फायबर मिळते जे पचन क्रिया वेगवान करते.
संकलित...
*टीप : वरील माहिती आवडल्यास नक्की पुढे पाठवा (शेअर करा) गरजूंना उपयोग होईल.👍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा