मित्रांनो, बऱ्याचदा खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते.
यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो, काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळतात, पण आरोग्यासाठी हे घातक आहे.
👉हे होतात दुष्परिणाम...
1.लठ्ठपणा वाढतो :
भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केल्यास, वेळी-अवेळी खाल्ल्यास, वजन वाढते, म्हणजे लठ्ठपणा वाढतो.
वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते व फॅट्स शरीरात जमा होतात, यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.
तेव्हा वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तरं, भूक लागेल तेव्हा वेळेवर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि दररोज किमान 45 मिनिटे व्यायाम करा.
2.मेंदूचे कार्य बिघडते :
आपल्या शरीरात ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमताही कमी होते.
3.चिडचिड :
तसेच भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो.
4.ताण-तणाव :
भुकेलेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो.
5.चक्कर येणे :
जर तुम्ही सातत्याने भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.
6.शीतपित्त वाढते :
वारंवार भुकेले राहिल्यास शरिरातील शीतपित्तात वाढ होत राहते. त्यामुळे त्वचेवर बारीक पुरळ येऊन प्रचंड खाज सुटते.
संकलित...
* टीप :
माहिती आवडल्यास सर्व ग्रुप वर शेअर करा, गरजूंना उपयोग होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
.jpeg)
Good
उत्तर द्याहटवा👍
उत्तर द्याहटवा